सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी जी नवीन शिक्षण प्रणाली अंमलात आणून मुलींसाठी शुल्क माफी करण्यात आल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी वालचंद महाविद्यालयात आयोजित कृत्यता चा सोळाव्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मानद सचिव वालचंद शिक्षण समूह सोलापूर डॉ. रणजीत गांधी, वैभव गांधी, आई प्रतिष्ठानचे संस्थापक व सोलापूरचे ज्येष्ठ समाजसेवक मोहन डांगरे, वालचंद शिक्षण समूहाचे खजिनदार भूषण शहा त्यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. जेणेकरून ती जिथे कुठे असेल तिथे सुरक्षितच राहिली पाहिजे. मुलींना शिक्षणात प्राधान्य दिले तरच त्या पुढे येऊन शकतील. यासाठी सरकारने मुलींसाठी शिक्षणामध्ये शंभर टक्के फी माफ केली त्यांचे शिक्षणाचा खर्च 100% पूर्णपणे माफ केला आहे नवे शैक्षणिक धोरण त्यांना विकसित करेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
तसेच शासनाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार पाच लाख मुलींना दरमहा दोन हजार रुपये कमवा व शिका या माध्यमातून देण्याचे ठरवले आहे. आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज कॅम्पस मध्ये कमवा व शिका द्वारे उद्योग निर्मिती करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड