देशाचे परराष्ट्र धोरण आता पंतप्रधानांचे वैयक्तिक परराष्ट्र धोरण बनले- राहुल गांधी
नवी दिल्ली , 24 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियात गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे आता भारताच्या राजकारणातही राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला सोमवारी लोकसभेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतही पश्चिम आशियातील संघर्षाबाबत भ
राहुल गांधीं


नवी दिल्ली , 24 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियात गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे आता भारताच्या राजकारणातही राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला सोमवारी लोकसभेनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतही पश्चिम आशियातील संघर्षाबाबत भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली. तर दुसऱ्या बाजूला संसद परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली.

पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारताचे परराष्ट्र धोरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक परराष्ट्र धोरण बनले आहे. याचा परिणाम असा दिसून येत आहे की, ते आता एक प्रकारचा विनोद बनला असून जगभरात त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आरोप केला की पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावाखाली आहेत. ट्रम्प यांना पंतप्रधान मोदी काय करणार आणि काय करणार नाहीत याची पूर्ण माहिती असते, असेही त्यांनी म्हटले. पुढे इशारा देताना राहुल गांधी म्हणाले की, जर पंतप्रधानांची भूमिका कमकुवत झाली तर देशाचे परराष्ट्र धोरणही कमकुवत होईल. अमेरिकेसोबत व्यापार करार करण्यात आला आणि काल संसदेत निरर्थक भाषण करण्यात आले, त्यामुळे भारताच्या पंतप्रधान म्हणून ठोस भूमिका दिसून आली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

यासोबतच त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयांमुळे सामान्य जनतेला अडचणींचा सामना करावा लागेल, जसे की एलपीजी आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती. राहुल गांधी यांनी आठवण करून दिली की पंतप्रधान मोदी यांनी परिस्थितीची तुलना कोविडसारख्या अवस्थेशी केली, मात्र कोविड काळात किती लोकांचे प्राण गेले आणि किती मोठ्या शोकांतिका घडल्या याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही. तसेच, केरळमधील कार्यक्रमामुळे ते सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीच्या नियोजनात संरचनात्मक चूक झाल्याचा आरोप करत ती आता दुरुस्त करता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले. पंतप्रधान अमेरिका आणि इस्रायलच्या सूचनांनुसार काम करतात तसेच देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेत नाहीत, असा आरोप करत त्यांनी ही परिस्थिती देश आणि जनतेसाठी चिंताजनक असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande