अमरजीत मिश्र यांच्या ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
मुंबई, 07 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना आज ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ या हिंदी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत भेट देण्यात आली. डॉ. मेधा सोमय्या यांनी मूळ मराठीत लिहिलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद अमरजीत मिश्र यांनी के
अमरजीत मिश्र यांच्या  ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न


मुंबई, 07 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना आज ‘अग्निशिखा सुषमा स्वराज’ या हिंदी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत भेट देण्यात आली. डॉ. मेधा सोमय्या यांनी मूळ मराठीत लिहिलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद अमरजीत मिश्र यांनी केला आहे.

सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी होत्या. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत भूषविलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला, असे उद्गार राज्यपालांनी याप्रसंगी काढले.

सुषमा स्वराज या अमोघ वक्त्या होत्या; उत्कृष्ट संसदपटू होत्या; लढवैय्या विरोधी पक्ष नेत्या होत्या व कार्यक्षम मंत्री होत्या. आज समाजाला त्यांच्या सारख्या समकालीन आदर्शवत व्यक्तिमत्वाची (रोल मॉडेलची) गरज आहे असे राज्यपालांनी सांगितले.

स्वराज यांनी केलेले संस्कृत मधील एक भाषण इतके अस्खलित आणि विद्वत्ता प्रचुर होते की संस्कृतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते ऐकावे. आपण विद्यापीठांना सुषमा स्वराज यांचे ते भाषण ऐकण्याची शिफारस करु असेही त्यांनी सांगितले.

उत्तर पूर्वेकडील राज्यात आपले पक्ष संघटन कमजोर होते. सुषमाजी मात्र कार्यकर्त्यांच्या निमंत्रणावरून आवर्जून उत्तर पूर्वेकडील राज्यांना भेट द्यायच्या. भाषणाला जाण्यापूर्वी त्या स्थानिक भाषेतील शब्द, वाक्य समजून घ्यायच्या व भाषणात वापरायच्या. त्यामुळे त्या उत्तर पूर्वेत अतिशय लोकप्रिय होत्या असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी लेखिका डॉ मेधा सोमैया व अनुवादक अमरजीत मिश्र यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ किरीट सोमय्या, नगरसेवक डॉ नील सोमय्या, मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande