- आगामी 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान आयोजन
- संघ शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांवर होणार चर्चा
नागपूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आगामी 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान जबलपूर (मध्यप्रदेश) येथे होणार आहे. या बैठकीत संघ कार्यांची सखोल समीक्षा केली जाईल, तसेच संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमांवर चर्चा होणार आहे.
या बैठकीच्या अनुषंगाने संघाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
या बैठकीत हिंदू संमेलने, जनसंवाद उपक्रम आणि समरसता अभियान यासारख्या उपक्रमांना अधिक गती कशी देता येईल, यावरही सविस्तर चर्चा होणार आहे. विशेषतः अनुसूचित जाती आणि जनजाती समाजांमध्ये संघाचा पोहोच वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
बैठकीतील प्रमुख मुद्दे
शताब्दी वर्ष कार्यक्रमांची समीक्षा – विस्तार, नियोजन आणि अंमलबजावणी.
समरसता अभियान – अनुसूचित जाती व जनजाती समुदायांशी संघाचा संवाद वाढवण्याचे धोरण.
संघटनात्मक स्थिती – शाखा विस्तार, कार्यपद्धती, व कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल.
संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश आणि महाकौशल प्रांतातील संघ कामकाज अतिशय प्रभावी असून, जबलपूरमधून संघाच्या पुढील दिशा व धोरणांबाबत महत्त्वाचा संदेश अपेक्षित आहे.
प्रतिनिधी सभा व कार्यकारी मंडळ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दोन प्रमुख बैठका होतात:
प्रतिनिधी सभा – मार्च महिन्यात नागपूरमध्ये
अखिल भारतीय कार्यकारी मंडळ बैठक – वेगवेगळ्या प्रांतांमध्ये दरवर्षी
मागील वर्षी ही बैठक मथुरा येथे झाली होती. दिवाळी आणि दसऱ्याच्या सुमारास होणारी ही बैठक दिवाळी बैठक म्हणूनही ओळखली जाते. बैठकीत शाखा विस्तार, प्रचारकांचे दायित्व, आणि संघटनात्मक बदलांवर चर्चा अपेक्षित आहे.
संघ शाखा विस्ताराचा आढावा
अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या मते, संघाच्या शाखा देशभर वेगाने वाढत आहेत. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने गेल्या तीन वर्षांत बस्ती व मंडल स्तरावरही शाखांचा विस्तार झाला आहे.
सध्या 83 हजार शाखा देशभर कार्यरत
तसेच 32 हजार साप्ताहिक मिलन केंद्रे सुरू
बैठकीत सहभागी होणारे प्रमुख प्रतिनिधी
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
सरकार्यवाह व सह-सरकार्यवाह
अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य
45 प्रांत व 11 क्षेत्रांचे संघचालक
भाजपाचे संघटन मंत्री
एकूण 300 हून अधिक प्रतिनिधी
ही बैठक संघाच्या आगामी धोरणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, जबलपूर येथून महत्त्वाचा संदेश दिला जाण्याची शक्यता आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी