छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
मराठ्यांच्या आरक्षणाला फाटा बसेल असे असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये, इतकीच आमची इच्छा आहे, नसता पूढचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.
शहरातील खाजगी रुग्णाो ो लयात उपचार घेत असलेले जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे मराठा आरक्षणाविरोधात सतत भूमिका घेत आहे. मात्र त्यांचे कोण ऐकतो, वडेट्टीवार हे लाभार्थी टोळीतील आहे. मुख्यमंत्र्यांनाही यांचे धंदे काय हे माहिती असल्याचे जरांगे म्हणाले.
जरांगे म्हणाले की, १९९४ चा जी.आर. रद्द करण्याची आमची मागणी आहे. मंडल कमिशनमध्ये ज्या जाती टाकल्या त्या बाहेर काढा कारण सध्या जशास तशी फाईट आहे.
आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते नाही तर ते त्या त्या जातीचे नेते असल्याचे जरांगे यांनी नमूद केले. . दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, अशी मागणी जरांगे यांनी केली.
छत्रपती संभाजी नगर आणि जालना जिल्हा पूर्वी एक होता. तेव्हा येथे २ लाख कुणबी होते. ते आता कुठं गायब झाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगावे.असे ते म्हणाले.
ही परिस्थिती सगळ्याच जिल्ह्यात असल्याचे ते म्हणाले. हैद्राबाद गॅझेटमध्ये कुणबी समाजाची जी संख्या आहे , तेच आजचे मराठे आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, बहाणे सांगू नका असेही ते म्हणाले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis