सोलापूर - ग्रामपंचायतीचे कामकाज दिवाळीत बंद होण्याची शक्यता
सोलापूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना पंधरा हजार सानुग्रह अनुदान द्यावे. तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडवा, अन्यथा ऐन दिवाळीत ग्रामपंचायतच्या संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी
सोलापूर - ग्रामपंचायतीचे कामकाज दिवाळीत बंद होण्याची शक्यता


सोलापूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना पंधरा हजार सानुग्रह अनुदान द्यावे. तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडवा, अन्यथा ऐन दिवाळीत ग्रामपंचायतच्या संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामपंचायतीचे कामे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्यात 27 हजार ग्रामपंचायत असून, त्यामध्ये 60 ते 70 हजार ग्रामपंचायत कर्मचारी विविध पदावर काम करत आहेत. परंतु गेल्या दहा ते बारा वर्षात राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या कोणतेही प्रश्न सरकारने मार्गी लावलेले नाहीत. मागील विधिमंडळाच्या झालेल्या प्रत्येक अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न, मागण्याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मात्र, शासनाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा दावा ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande