रत्नागिरी जिल्ह्यात सागर कवच अभियान यशस्वी
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात १९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सागर कवच अभियान अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या अभियानामध्ये रत्नागिरी पोलीस दल, तटरक्षक दल, नौदल, कस्टम, बंदर विभाग, फिशरी
सागर कवच अभियान


रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात १९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सागर कवच अभियान अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले.

या अभियानामध्ये रत्नागिरी पोलीस दल, तटरक्षक दल, नौदल, कस्टम, बंदर विभाग, फिशरी विभाग, समुद्र किनाऱ्यावरील खासगी बंदरे, जेट्टी आस्थापना सहभागी झाल्या होत्या. हे अभियान भारतीय तट रक्षक दलाकडून एकाच वेळी महाराष्ट्र व गोवा राज्यात राबविण्यात आले.

सागरी मार्गाने होणाऱ्या घुसखोऱ्या व आतंकवादी कारवाई रोखणे तसेच सागरी सुरक्षेशी संबंधित सर्व विभागांनी घ्यावयाची खबरदारी व युद्धजन्य परिस्थितीत प्रतिसाद यांचा सराव करणे व किनारपट्टी सुरक्षेसंबंधी सर्व सागरी घटकांना प्रशिक्षण देणे व सागरी सुरक्षा घटकांमध्ये समन्वय साधणे हा या अभियानाचा उद्देश होता.

अभियानादरम्यान शत्रू पक्षाकडून एक घुसकोर टीम बोटीद्वारे रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने पाठविण्यात आलेली होती. या अभियानामधील बचावाचे काम करणाऱ्या सुरक्षा एजन्सी (ब्ल्यू फोर्स) कडून आई लाभ-लक्ष्मी या ट्रॉलर बोट पेट्रोलिंग दरम्यान रत्नागिरी लाइट हाऊससमोरील अरबी समुद्रात 3.5 नॉटिकल मैल अंतरावर रेड फोर्स (शत्रू पक्ष) नवदुर्ग नावाची IND-MH-06-199 | 09 एक बोट संशयास्पद फिरताना पकडण्यात आली आहे. दलाने बोटीवर चढून चौकशी केली असता बोटीवर अभियानामधील संशयित 6 इसम मिळून आल्याने बचावाचे काम करणाऱ्या सुरक्षा एजन्सी (ब्ल्यू फोर्स) यशस्वी झाली आहे.

या अभियानामध्ये ४८ पोलीस अधिकारी, ४६४ पोलीस अंमलदार, १०० होमगार्ड, ४७ सुरक्षा वार्डेन, ४१ सागर रक्षक दल सदस्य, ६८ पोलीस पाटील, ४४ एन.सी.सी कॅडेट, ४० एन.एस.एस. विद्यार्थी, २ अधिग्रहित ट्रॉलर इतके मनुष्यबळ वापरण्यात आले.याअभियाना दरम्यान एकूण ४,७८७ विविध वाहने चेक करण्यात आली तर ९,७८९ व्यक्ती चेक करण्यात आल्या. समुद्रातील विविध ८० बोटी व या बोटीवरील ९६० व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande