चंद्रपूर - चिमूर तालुक्यात व्याघ्रहल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
चंद्रपूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात पुन्हा एकदा व्याघ्र हल्ल्याची भीषण घटना समोर आली आहे. चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी परिसरात एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे मंगळवारी सायंकाळी उघड झाले. सोमवारी सायंकाळी शेषराव झाडे
चंद्रपूर - चिमूर तालुक्यात व्याघ्रहल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू


चंद्रपूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात पुन्हा एकदा व्याघ्र हल्ल्याची भीषण घटना समोर आली आहे. चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी परिसरात एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे मंगळवारी सायंकाळी उघड झाले.

सोमवारी सायंकाळी शेषराव झाडे (४५) हे शंकरपूर येथे बाजार हाट करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांच्या शोधासाठी गावकऱ्यांनी रात्रभर प्रयत्न केले; मात्र त्यांचा काहीच मागमूस लागला नव्हता. मंगळवारी सायंकाळी शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत एमएसईबी कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचा वरचा भाग वाघाने खाल्लेल्या अवस्थेत असल्याचे आढळल्याने हा वाघाचा हल्ला असल्याची खात्री पटली. कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी ताबडतोब ही माहिती वनविभाग आणि पोलिसांना दिली. तेव्हा वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. सदर घटना समोर आल्यानंतर ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande