जळगाव , 26 सप्टेंबर (हिं.स.) : प्रांजल खेवलकर यांना खोट्या आरोपाखाली अडकवण्यात आले होते. खेवलकर यांच्यावर फार मोठे गुन्हे असे दावे करत त्यांना पहिला आरोपी करण्यात आले. कुणाच्यातरी सांगण्यावरुन कोणीतरी खेवलकर यांना अडकवल्याचा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी भागातील एका खोलीत पार्टी करत असताना पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. प्रांजल खेलवरकर यांच्यासह इतरांना 7 जणांना अटक करण्यात आली होती. खेवलकर यांच्यासह इतरांना जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राज्याचे राजकारण किती खालच्या थरावर गेले, याचे उत्तम उदाहरण आहे, असे श्री. खडसे यांनी म्हटले. प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर ते उद्या तुरुंगाबाहेर येऊ शकतात. एकनाथ खडसे यांनी जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळताच प्रतिक्रिया दिली आहे. प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात गुरुवारी प्रांजल खेवलकर यांच्यासह अन्य जणांना जामीन मिळाला आहे. त्यांनी कुठलेही ड्रग्ज सेवन केलेले नव्हते किंवा बाळगले नव्हते तरी त्यांना खोट्या आरोपाखाली रेव्ह पार्टी केली म्हणून सांगितले गेले. प्रत्यक्ष चार ते पाच जण एका घरात पार्टी करत होते ती रेव्ह पार्टी होऊ शकत नाही. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यावर फार मोठे गुन्हे आहेत असा दावा केला गेला. त्यामुळे त्यांना पहिल्या क्रमांकाचे आरोपी केले मात्र प्रांजल खेवलकर यांच्यावर आयुष्यात एकही गुन्हा नव्हता. कोणीतरी कोणाच्यातरी सांगण्यावरून प्रांजल खेवलकर यांना गोवण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर यांना आता जामीन मिळाला आहे. या प्रकरणात न्यायालयात होणाऱ्या खटल्यात प्रांजल खेवलकर निर्दोष सुटतील, असा माझा विश्वास असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. मात्र, महाराष्ट्रातील राजकारण किती खालच्या थरावर गेलेला आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे, असेही खडसे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर