चंद्रपूर: पावसामुळे डेंग्यूच्या उद्रेकाची शक्यता, सतर्कता बाळगा - महापालिका
चंद्रपूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। काही दिवसापासून शहरात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डेंग्यूच्या उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले आहे. महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक य
चंद्रपूर: पावसामुळे डेंग्यूच्या उद्रेकाची शक्यता, सतर्कता बाळगा - महापालिका


चंद्रपूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। काही दिवसापासून शहरात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डेंग्यूच्या उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक योजना सुरु असल्यातरी नागरिकांना स्वतःचा संरक्षणासाठी पुढील उपाय योजना करणे आवश्यक आहे.

घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी साचू देऊ नये, ज्या भांड्यात तुम्ही पाळीव प्राण्यांना पाणी देता ते भांडे स्वच्छ ठेवने, पाण्याची टाकी चांगल्या प्रकारे झाकून ठेवने, कुलर आणि पाण्याच्या टाकीत आठवड्यातून एकदा थोडे पेट्रोल टाकने, तसेच रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला पाण्याचा ट्रे दररोज रिकामे करणे आवश्यक आहे.

कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु,170 आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन प्रत्येक घरामध्ये सतर्कता बाळगण्याचे इशारा दिला जात आहे.पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande