अहमदपूर - अतिवृष्टीमुळे चिलखा येथील अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका
लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे चिलखा येथील अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली. अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिखला येथे चार मजूर अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यां
अ


लातूर, 27 सप्टेंबर (हिं.स.)।

अहमदपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे चिलखा येथील अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली. अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिखला येथे चार मजूर अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीतत्काळ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्याशी संपर्क करून एनडीआरएफ यांची टीम त्या ठिकाणी रवाना केली.

यामध्ये स्वतः मंत्री पाटील यांनी चिलखा येथे जाऊन ते मजूर सुखरूप बाहेर निघेपर्यंत उपस्थित राहिले. पहाटे पाच पासून अडकलेल्या मजुराची प्रशासनाच्या मदतीने सुखरूप सुटका केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलीस निरीक्षक भुसनर सह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande