गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला; दहा मेंढ्यासह महिलेचा मृत्यू
नाशिक, 27 सप्टेंबर (हिं.स.) - शनिवारी सायंकाळी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला या पावसामुळे बागलाण तालुक्यात घराची भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर मालेगाव मध्ये दहा मेंढ्या मृत्यू झाल्या असून गुराखी देखील जखमी झालेला आहे. तर गोदावरी नदी
गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला; दहा मेंढ्यासह महिलेचा मृत्यू


नाशिक, 27 सप्टेंबर (हिं.स.) - शनिवारी सायंकाळी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला या पावसामुळे बागलाण तालुक्यात घराची भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर मालेगाव मध्ये दहा मेंढ्या मृत्यू झाल्या असून गुराखी देखील जखमी झालेला आहे. तर गोदावरी नदीतून तीन हजार 938 शिवसेने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीची वाढलेली पाणी पातळी कायम आहे.

जिल्ह्यामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे यामध्ये शनिवारी पावसाचे हस्त नक्षत्र सुरू झाले असून शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळी मध्ये सातत्याने वाढ होत आहे तर पावसामुळे नदी पात्र ही तुडुंब भरून वाहू लागलेले आहे. वेधशाळेने दिलेल्या इशारानुसार जिल्ह्यामध्ये जोरदार हवा सुरू राहणार आहे असा जो इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार हवा देखील सुरू आहे .

शनिवारी जिल्ह्यामध्ये सायंकाळी सर्वात भागांमध्ये पाऊस झाला यामध्ये सातत्याने गंगापूर धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सायंकाळपर्यंत 2801 क्लासेस इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता त्यामध्ये रात्री आठ वाजता 1137 ने वाढ करून रात्री 3 हजार 938 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीची जी पाणी पातळी वाढलेली होती ती शनिवारी रात्री देखील कायमच आहे. इतरही धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे शनिवारी रात्री उशिरा इतरही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान शनिवारी रात्री उशिरा सुरू असलेल्या या पावसामुळे मालेगाव जिल्ह्यातील मळगाव या ठिकाणी मेंढ्या चारुन घराकडे जात असताना अचानक वीज कोसळल्यामुळे समाधान वाळके हा सोळा वर्षीय गुराखी जखमी झालेला आहे तर त्याच्या दहा मेंढ्या या वीज पडून मृत्यू झालेल्या आहेत. तर कडेगव्हाण या ठिकाणी गोठ्यावरती वीज पडल्यामुळे एका म्हशीचा देखील मृत्यू झालेला आहे बागलाण तालुक्यातील गोरान या गावी सतत सुरू असलेल्या पावसामुळे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी आहे तिला बागलाण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे इतरही भागांमध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande