चंद्रपूरमध्ये १४ ते २२ जानेवारीदरम्यान भव्य श्रीराम कथा महोत्सव; पूज्य राजन महाराज करणार कथावाचन
चंद्रपूर, ०८ जानेवारी (हिं.स.) चंद्रपूरच्या आध्यात्मिक इतिहासात एक नवा सुवर्णअध्याय जोडला जाणार असून, लखमापूर हनुमान मंदिराच्या तत्वावधानाखाली व श्रीराम कथा सेवा समितीच्या वतीने १४ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘लखमापूर धाम’ (चांदा क्लब ग्राउंड)
चंद्रपूरमध्ये १४ ते २२ जानेवारीदरम्यान भव्य श्रीराम कथा महोत्सव; पूज्य राजन महाराज करणार कथावाचन


चंद्रपूर, ०८ जानेवारी (हिं.स.) चंद्रपूरच्या आध्यात्मिक इतिहासात एक नवा सुवर्णअध्याय जोडला जाणार असून, लखमापूर हनुमान मंदिराच्या तत्वावधानाखाली व श्रीराम कथा सेवा समितीच्या वतीने १४ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘लखमापूर धाम’ (चांदा क्लब ग्राउंड) येथे भव्य श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केवळ धार्मिक सोहळा नसून, संस्कारांच्या पुनर्जागरणाचा एक व्यापक उत्सव ठरणार आहे.

पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगप्रसिद्ध मानस मर्मज्ञ परम पूज्य राजन जी महाराज आपल्या अमृतमय वाणीने प्रभू श्रीरामांच्या पावन लीलांचे कथन करणार आहेत. साधेपणा आणि विद्वत्तेचा अद्भुत संगम असलेले पूज्य राजन जी महाराज पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथे जन्मलेले असून, उत्तर प्रदेशातील बलिया येथील संस्कारांत घडले आहेत. बालपणापासूनच रामायण व अध्यात्माला समर्पित जीवन जगत, शास्त्रीय गायनाचे शिक्षण आणि रामचरितमानसावरील अपार प्रेमामुळे ते एक अद्वितीय कथावाचक म्हणून ओळखले जातात.

पूज्य राजन जी महाराज यांनी भारतातील सर्व राज्यांसह अमेरिका, ब्रिटन, कॅनडा तसेच आखाती देशांमध्ये श्रीराम कथेचा प्रचार केला आहे. युट्यूब व सोशल मीडिया माध्यमांवर त्यांच्या प्रवचनांना कोट्यवधी वेळा पाहिले गेले असून, यामुळे युवक मोठ्या प्रमाणावर सनातन संस्कृतीशी जोडले जात आहेत. ‘राम की भक्ति में’ यांसारखी त्यांची भजने आणि रामचरितमानसाच्या चौपायांचे सुमधुर गायन थेट श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करते.

महाराज जी यांच्या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ते कथेला वर्तमान जीवनातील प्रश्नांशी जोडतात. त्यांच्या प्रेरणेमुळे लाखो लोकांनी नशा, मांसाहार व कुप्रथांचा त्याग करून ‘राम-पथ’ स्वीकारला आहे.

कथापूर्वी १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री लक्ष्मी नारायण मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत सुमारे ७,००० हून अधिक भक्त सहभागी होणार असून, ५०० मातृशक्ती पारंपरिक वेशभूषेत कलश धारण करून सहभागी होतील. भजन मंडळ्या, युवकांचे पथक आणि भव्य झांक्यांमुळे चंद्रपूरचे रस्ते ‘अयोध्यामय’ स्वरूप धारण करतील.

महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ नेते व आमदार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार व सौ. सपना मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच श्रीराम कथा सेवा समितीचे अध्यक्ष श्री हरीशजी भट्टड व समिती सदस्यांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा साकार होत आहे. भाविकांच्या सोयीसाठी लखमापूर धाम येथे १०,००० हून अधिक श्रद्धाळूंना बसण्याची व्यवस्था असलेला वॉटरप्रूफ मंडप, पिण्याचे पाणी तसेच सुलभ प्रवेश-निर्गमन व्यवस्था करण्यात आली आहे.

कथेदरम्यान नशामुक्ती, सामाजिक एकोपा, स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचा विशेष संदेश दिला जाणार आहे. ‘जात-पात विचारू नये कोणी’ या भावनेतून संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र बांधण्याचा समितीचा उद्देश आहे.

या प्रसंगी समितीचे संरक्षक सुधीर मुनगंटीवार यांनी आवाहन केले की, “हा प्रसंग केवळ कथा ऐकण्याचा नसून, आपल्या अंतःकरणातील राम जागवण्याचा आहे.” १४ ते २२ जानेवारीदरम्यान दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande