रायगडमध्ये पाणीटंचाई तीव्र; ६४ टँकरद्वारे १ लाखांहून अधिक नागरिकांना दिलासा
रायगड, 22 मे (हिं.स.)। जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली असून, जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. १८ मे २०२६ अखेर जिल्ह्यातील ६४ गावे व २३० वाड्यांमधील तब्
जल


रायगड, 22 मे (हिं.स.)। जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली असून, जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. १८ मे २०२६ अखेर जिल्ह्यातील ६४ गावे व २३० वाड्यांमधील तब्बल १ लाख १३ हजार ७०९ नागरिकांना या टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कार्यरत असलेले सर्व टँकर खासगी स्वरूपातील असून शासकीय अथवा मदतीचे टँकर सध्या कार्यरत नाहीत.सर्वाधिक गंभीर परिस्थिती पेण तालुक्यात निर्माण झाली असून येथे ९ गावे व ७६ वाड्यांसाठी १२ टँकर कार्यरत आहेत. या माध्यमातून २४ हजार ७६५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानंतर महाड तालुक्यात १४ गावे व ८७ वाड्यांतील २२ हजार २४३ नागरिकांना ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Panvel तालुक्यात १० गावे व ८ वाड्यांसाठी ९ टँकर कार्यरत असून १८ हजार ५५३ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच कर्जत तालुक्यात ३ गावे व ११ वाड्यांसाठी ८ टँकर, खालापूर तालुक्यात ५ गावे व ९ वाड्यांसाठी ६ टँकर, तर माणगाव तालुक्यात ४ गावे व १५ वाड्यांसाठी ५ टँकर कार्यरत आहेत.

याशिवाय अलिबाग तालुक्यात ४ गावे, Uran तालुक्यात ४ वाड्या, सुधागडपाली तालुक्यात २ वाड्या, रोहा तालुक्यात ३ गावे, पोलादापूर तालुक्यात ५ गावे व १४ वाड्या, म्हसळा तालुक्यात ६ गावे व १ वाडी, तसेच श्रिवर्धन तालुक्यात १ गाव व ३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जावळे किसान यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाईग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande