पश्चिम बंगाल : धर्मतला येथील वाय चॅनेलवर तृणमूलचे धरणे आंदोलन; ममता यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित
कोलकाता, 02 जून (हिं.स.)। मतदानानंतर झालेल्या कथित राजकीय हिंसाचाराच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसतर्फे मंगळवारी धर्मतला येथील वाय चॅनेलवर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. धरणेस्थळी पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह पक्षाचे जवळपास सर्व प्र
Mamata protest y channel Kolkata


कोलकाता, 02 जून (हिं.स.)। मतदानानंतर झालेल्या कथित राजकीय हिंसाचाराच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसतर्फे मंगळवारी धर्मतला येथील वाय चॅनेलवर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. धरणेस्थळी पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह पक्षाचे जवळपास सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. पोलिसांनी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यक्रमास परवानगी दिली आहे. यानिमित्ताने परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महिला पोलिस कर्मचाऱ्यांचीही लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे.

तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राणी रासमणी अव्हेन्यू येथे धरणे आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. मात्र, तेथे आधीपासूनच नियोजित कार्यक्रम असल्याचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली. सोमवारी पोलिसांनी तृणमूलला वाय चॅनेल येथे कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचा पर्याय सुचवला. त्यानंतर वाय चॅनेल येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली.

परवानगी प्रक्रियेबाबत तृणमूलच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षाचे आमदार कुणाल घोष यांनी, पूर्वनियोजित कार्यक्रम असतानाही नव्याने अर्ज करण्याची गरज का भासली, असा प्रश्न उपस्थित केला होता. तर खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उशिरा रात्री ई-मेल पाठवून परवानगीसाठी नव्या अटी कळवण्यात आल्याचा आरोप केला. विरोधी आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.

मंगळवारी दुपारपासूनच तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते वाय चॅनेल येथे जमू लागले. माजी मंत्री शोभनदेव चॅटर्जी, नयना बॅनर्जी, चंद्रिमा भट्टाचार्य यांच्यासह अनेक नेते आंदोलनस्थळी उपस्थित होते. वरिष्ठ नेते अशोक देव हे देखील धरणेस्थळी पोहोचले. मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक तेथे जमले असून त्यांनी ‘जय बांगला’च्या घोषणा दिल्या.

तृणमूलचा आरोप आहे की, नवीन भाजप सरकार राजकीय सूडबुद्धीने त्यांच्या कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करत आहे. दुसरीकडे, राजकीय निरीक्षक या घडामोडींची तुलना त्या काळाशी करत आहेत, जेव्हा राज्यात तृणमूल सरकारच्या कार्यकाळात भाजपला अनेक कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत होता आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना अनेकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत होते.ममता बॅनर्जी यांचे हे धरणे आंदोलन विधानसभा निवडणुकीनंतरचे त्यांचे पहिले मोठे राजकीय आंदोलन मानले जात असून, राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande