नेपाळमधील पुरात आतापर्यंत 157 जणांचा मृत्यू, परदेशी नागरिकांसह जवळपास ७०० जण बेपत्ता
काठमांडू, २७ ऑगस्ट (हिं.स.)नेपाळमधील रसुवा आणि आसपासच्या परिसरातील भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी अचानक आलेल्या पुरामुळे बुधवार सकाळपासून किमान १५७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ७०० जण बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये परदेशी नागरिक आणि सुरक्
नेपाळमधील पुरात  आतापर्यंत 157 जणांचा मृत्यू


काठमांडू, २७ ऑगस्ट (हिं.स.)नेपाळमधील रसुवा आणि आसपासच्या परिसरातील भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी अचानक आलेल्या पुरामुळे बुधवार सकाळपासून किमान १५७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ७०० जण बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये परदेशी नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पुरामुळे तीन जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला असून, माणसे, घरे, वाहने आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. अलिकडच्या वर्षांतील नेपाळमधील ही सर्वात प्राणघातक जल-आपत्ती मानली जात आहे. नेपाळ पोलिसांनी एक्स-पोस्टवर प्रसिद्ध केलेल्या रसुवा जिल्ह्यातील रात्री उशिराच्या पूर-अद्ययावत माहितीनुसार, मृतांचा आकडा १५७ असल्याची पुष्टी झाली आहे.

पुरात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नेपाळमध्ये, चीनला लागून असलेल्या जिल्ह्यांपासून ते भारतीय सीमेलगतच्या भागांपर्यंत सापडले आहेत. नेपाळ पोलिसांनी अद्ययावत माहिती देण्यापूर्वी जारी केलेल्या सरकारी निवेदनानुसार, सर्वाधिक प्रभावित रसुवा जिल्ह्यातून केवळ एक मृतदेह सापडला असून, भारताच्या सीमेला लागून असलेल्या चितवनमधील नारायणी नदीतून ६४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गोरखा जिल्ह्यातून १९, धाडिंग जिल्ह्यातून १८, नुवाकोटमधून ११, तनहूमधून नऊ आणि भारताच्या सीमेला लागून असलेल्या नवलपरासी जिल्ह्यातून एक मृतदेह सापडला आहे.

आतापर्यंत, संबंधित जिल्हा प्रशासकीय कार्यालयांकडून २४५ स्थानिक रहिवाशांशी संपर्क होत नसल्याची माहिती मिळाली आहे. याव्यतिरिक्त, नेपाळ पोलिसांचे २६ जवान, नेपाळ लष्कराचे २२ जवान आणि सशस्त्र पोलीस दलाचे १३ जवान बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागात एकूण ३८४ पर्यटकही मृत्युमुखी पडले आहेत. नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, बेपत्ता पर्यटकांमध्ये १३९ भारतीयांचा समावेश आहे. भारतीय वंशाचे ३७ अनिवासी भारतीय (एनआरआय) देखील बेपत्ता आहेत.

नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत ८१ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांवर काठमांडू आणि आसपासच्या जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत बचाव कार्यादरम्यान २१६ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी १२३ जणांना हेलिकॉप्टरने आणि ९३ जणांना जमिनीवरून वाचवण्यात आले.

पुरामुळे अनेक भागांतील वाहतूक आणि दळणवळण पायाभूत सुविधांवरही गंभीर परिणाम झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ३५ पूल आणि ४५ झुलते पूल वाहून गेल्याने अनेक भागांमधील दळणवळण विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे, महामार्गाचा ४० किलोमीटरचा पट्टाही पुरामुळे बाधित झाला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, परिस्थिती गंभीर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande