आरसीबीवर कठोर कारवाई होणार ?, बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय अपेक्षित
नवी दिल्ली, 12 जून (हिं.स.)। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले. ही संघाची पहिली आयपीएल ट्रॉफी होती. यानंतर आरसीबीच्या संघाने दुसऱ्या दिवशी जेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूला पोहोचला. बंगळुरूच्या चिन्ना
आरसीबी


नवी दिल्ली, 12 जून (हिं.स.)।

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ चे विजेतेपद

पटकावले. ही संघाची पहिली आयपीएल ट्रॉफी होती. यानंतर आरसीबीच्या संघाने दुसऱ्या दिवशी जेतेपदाचा

आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूला पोहोचला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर

चाहत्यांची गर्दी अनियंत्रित झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला.

आता या दुर्घटनेतून धडा घेत, भारतीय

क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आयपीएलमध्ये विजय साजरा करण्यासाठी नवे नियम

बनवण्याचा विचार करत आहे.

आयपीएलमध्ये

विजयी जल्लोषासाठी नवीन नियम निश्चित करणे हा बीसीसीआयच्या २८ व्या शिखर

परिषदेच्या बैठकीचा प्रमुख मुद्दा असणार आहे. ही बैठक शनिवारी होण्याची शक्यता

आहे. या बैठकीदरम्यान, आयपीएल विजयाच्या जल्लोषासाठी नियम

बनवण्याची गरज यावर चर्चा केली जाईल. बीसीसीआयच्या या बैठकीत

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेच्या ठिकाणावरही चर्चा केली जाणार आहे.

आयपीएलचे

विजेतेपद जिंकल्यानंतर संघ ट्रॉफीसह रोड शो करतात. आणि त्यांच्या मूळ शहरात आनंद साजरा

करतात. मात्र, पोलिसांनी आरसीबीला रोड शोसाठी परवानगी दिली नव्हती. आरसीबीचा संघ

आधी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विधानसभेत आणि नंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये

गेला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande