लंडन, 12 जून (हिं.स.)।
इंग्लंडविरुद्धच्या
आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाच्या निवडीबद्दल माजी भारतीय कर्णधार सौरव
गांगुलीने नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला
संघात स्थान न मिळाल्याबद्दल त्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या
वर्षभरातील अय्यरने दाखवलेल्या कामगिरीचा विचार करता, त्याला कसोटी संघात स्थान मिळायला हवं होतं असं
मत गांगुलीने व्यक्त केलं आहे.
श्रेयस अय्यरने गेल्या एका वर्षात आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष
वेधून घेतलं आहे. तो दबावातही धावा करत आहे आणि शॉर्ट बॉलसारख्या आव्हानांनाही
चांगल्या प्रकारे तोंड देत आहे. मला माहित आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे वेगळे
आहे. पण
त्याची उत्कृष्ट कामगिरी दुर्लक्षित करता येणार नाही. जर मी संघ निवडकर्ता असतो तर
मी त्याला या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी नक्कीच दिली असती. असं परखड मत भारताचा
माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे.
गांगुलीच्या या विधानावरून स्पष्ट होते की, तो निवड समितीच्या
निर्णयावर समाधानी नाही. अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या भारतीय संघात
अय्यरचा समावेश नव्हता, जो अनेक क्रिकेट चाहते आणि क्रिकेट समीक्षकांसाठी धक्कादायक निर्णय
होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra