रत्नागिरी : वाल्मीकीनगर गावातील आदिवासींकरिता धरती आबा अभियान
रत्नागिरी, 14 जून, (हिं. स.) : केंद्र सरकारतर्फे देशातील आदिम बांधवांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १६ जूनपासून अभियानाला प्रारंभ होईल. हे अभियान मंडणगड तालुक्यात
रत्नागिरी : वाल्मीकीनगर गावातील आदिवासींकरिता धरती आबा अभियान


रत्नागिरी, 14 जून, (हिं. स.) : केंद्र सरकारतर्फे देशातील आदिम बांधवांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १६ जूनपासून अभियानाला प्रारंभ होईल. हे अभियान मंडणगड तालुक्यातील वाल्मीकीनगर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेत 20 व 25 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे अभियान प्रधानमंत्री आदिवासी न्याय महा अभियायाच्या (पीएम जनमन) धर्तीवर असून गावपातळीवर थेट शिबिरे आयोजित करुन विविध शासकीय योजनांचे लाभ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. केंद्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी विषय आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री सिंह व सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वैदेही रानडे आहेत. पेण येथील आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत.

मंडणगड तालुक्यामध्ये 16 ते 30 जून या कालावधीमध्ये तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी गावपातळीवर शिबिरे आयोजित करणार आहेत. या शिबिरामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, पी.एम. किसान सन्मान योजना, जनधन खाते, पी.एम. जीवन ज्योती विमा योजना, पी.एम. सुरक्षा विमा योजना, शिष्यवृत्ती कव्हरेज, उज्ज्वला गॅस योजना, जातीचे दाखले, रहिवासी दाखले, घरकुल योजना, पी.एम. मातृ वंदना योजना, सुकन्या समृद्धी योजना, रस्ते बांधणी योजना, पी. एम. विश्वकर्मा योजना इत्यादी विविध योजनांचे लाभ दिले जाणार आहेत.

मंडणगड तालुक्यातील वाल्मीकीनगर गावातील सर्व आदिवासी लाभार्थींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande