रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील विश्रामगृह सुविधेचे उद्घाटन
रत्नागिरी, 2 जून, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील नातेवाइकांच्या विश्रामगृह सुविधेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. रुग्णांप्रमाणेच त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांचे दुःख, त्रास, अनिश्चितता आपण जाणतो. उपचार घेत असलेल्या
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील विश्रामगृह सुविधेचे उद्घाटन


रत्नागिरी, 2 जून, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील नातेवाइकांच्या विश्रामगृह सुविधेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

रुग्णांप्रमाणेच त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांचे दुःख, त्रास, अनिश्चितता आपण जाणतो. उपचार घेत असलेल्या रुग्णांची काळजी घेताना नातेवाईक अनेक अडचणींना सामोरे जातात. यात राहण्याची गैरसोय ही सर्वांत महत्त्वाची. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्रातील पहिले नातेवाईकांसाठी विश्रामगृह उभारण्यात आले, ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

हे विश्रामगृह केवळ निवासासाठी नाही, तर नातेवाईकांना मानसिक आधार देणारे, एक धीर देणारे ठिकाण ठरेल. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीचा आणि सुरक्षित आधार मिळेल, असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला.विश्रामगृहात महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्हेंटिलेशन, बसण्याच्या व झोपण्याच्या सोयी सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे नातेवाईकांना आरोग्य सेवा घेण्यासाठी शहरात परगावाहून आले असताना मोठा दिलासा मिळेल, असेदेखील सामंत म्हणाले. कार्यक्रमाला माजी आमदार राजन साळवी, वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे, पदाधिकारी व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande