रत्नागिरी : अधिकृत माहिती घेऊन मानवी दृष्टिकोनातून वार्तांकन करावे – जितेंद्र दीक्षित
रत्नागिरी, 2 जून, (हिं. स.) : एखादा संघर्ष झाल्यास लोकांना जागृत करणे पत्रकारांचे काम आहे. अशा वेळी अधिकृत माहिती घेऊन मानवी दृष्टिकोनातून जबाबदारीने वार्तांकन करावे, असे मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी केले.कोकण विभागीय माहिती कार
जितेंद्र दीक्षित


रत्नागिरी, 2 जून, (हिं. स.) : एखादा संघर्ष झाल्यास लोकांना जागृत करणे पत्रकारांचे काम आहे. अशा वेळी अधिकृत माहिती घेऊन मानवी दृष्टिकोनातून जबाबदारीने वार्तांकन करावे, असे मार्गदर्शन ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी केले.कोकण विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कोकण विभागातील पत्रकारांच्या दोन दिवसीय कार्यशाळेत युद्धजन्य परिस्थितीतील पत्रकारिता या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल उपस्थित होते.

संगणकीय सादरीकरण करत श्री. दीक्षित म्हणाले, वार्तांकनाच्या माध्यमातून संघर्षाचे कारण माहिती करून घेणे आवश्यक आहे. संघर्षात आपण बाधित लोकांचा आवाज आहोत. संघर्षाच्या काळात अफवा पसरण्यापासून थांबविणे ही आपली जबाबदारी आहे. या कारणांमुळे संघर्ष क्षेत्रातील पत्रकारिता महत्त्वाची आहे. संघर्ष क्षेत्रात जाण्यापूर्वी योग्य संशोधन करणे महत्त्वाचे असून, त्यामुळे प्रभावी वार्तांकन करता येऊ शकते. संघर्ष क्षेत्रात पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वार्तांकन करण्यास मदत होते.

संघर्ष क्षेत्रात जाताना आपल्या सोबत ओळखपत्र, जॅकेट, हेल्मेट, प्रथमोपचार पेटी, पॉवर बॅंक, पेन किलर आणि खाण्याचे काही सामान असावे. तेथे जाण्यापूर्वी तेथे आपली ओळखीची व्यक्ती आहे का, हे तपासून तेथील स्थिती जाणून घ्यावी. जे पात्र असतील त्यांनी डिफेन्स करस्पॉन्डंट कोर्स पूर्ण करावा. तेथील रिस्क असेसमेंट करावी, लोकांशी बोलावे. वार्तांकन करताना तुमची पोझिशनिंग निश्चित व सुरक्षित ठिकाणी असावे. पत्रकार म्हणून आपली ओळख स्पष्ट होईल, असे राहावे. एक्झिट प्लॅन तयार ठेवावा. स्थानिकांनी दिलेली माहिती दुर्लक्षित करू नये. टीमवर्क म्हणून काम करावे. अशा परिस्थितीत वैयक्तिक फायदा पाहू नये. नैतिक वार्तांकन करावे.

बातमीत तथ्यात्मकता असावी. बातमी देताना संवेदनशीलता बाळगावी व निष्पक्ष राहावे. अशा परिस्थितीत फिजिकल डेंजर, सेन्सॉरशिप, चुकीची माहिती, इमोशनल टोल ही आव्हाने आहेत. वार्तांकन करताना अथवा केल्यानंतरच्या भावनात्मक धक्क्यातून सावरणेदेखील गरजेचे आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना संघर्षाची माहिती प्रभावीपणे द्यावी, असे सांगून श्री. दीक्षित यांनी संघर्ष परिस्थितीत वार्तांकन करतानाचे त्यांचे अनुभव कथन केले.यावेळी प्रभारी उपसंचालक अर्चना शंभरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande