
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्याबरोबर आवास , शेत रस्ते, कृषी, पाणीपुरवठाया पायाभूत विकास योजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी येथे दिले.
पैठण तहसील कार्यालयामध्ये आढावा तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम ,उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी अनुपमा गायकवाड, नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी बळीराम राठोड, विस्तार अधिकारी मनोज चव्हाण गटशिक्षण अधिकारी यांच्यासह सर्व तालुकास्तरीय अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती.
आवास योजनेतील घरकुलांसाठी मोफत वाळू वाटप, लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज व त्याचा संबंधित विभागाला निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करावा.मतदार यादी मॅपिंगचे काम , जनगणना कामाच्या संदर्भातील प्रशिक्षण, कृषी लागवडीखालील क्षेत्राच्या सिंचन सुविधा व पीक प्रकार याबाबत आढावा घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत पानंद रस्ते,. तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी आणि वाटप याबाबतही संबंधितांना सूचना दिल्या.
पानंद रस्त्याचे कामकाज आणि फेरफार नोंदीचे प्रकरण एक महिन्याच्या वर प्रलंबित ठेवू नये, तसेच पीएम किसान ,ई केवायसी आणि ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्यावे. आवास योजनेतील घरांसाठी मोफत राखीव वाळू उपलब्ध करून देण्या बरोबरच नवीन वाळू घाटा वरील वाळू उपलब्ध करून देण्यात यावी. प्रत्येक अधिकाऱ्याने क्षेत्रभेटी देऊन संबंधित योजनेच्या कामकाजाची वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामविकासाच्या विविध योजनांचा घेतला आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम यांनी ग्राम विकास अंतर्गत असलेल्या विविध विकास कामाच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी घेतला .पायाभूत सेवा पुरवठा करणाऱ्यांमध्ये अंगणवाडी, शाळा आणि आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालय हे सुस्थितीत कार्यान्वित असायला पाहिजेत या अनुषंगाने आवश्यक ते कार्यवाही करून स्वच्छ ,सुंदर कार्यालय संकल्पना राबविण्यात यावी. सुसज्ज अंगणवाड्या, आरोग्य केंद्र करावेत ,याबाबत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरकुलाचे उद्दिष्ट प्राधान्याने पूर्ण करून आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घर देण्यासाठी योग्य ती कार्यवाही ग्रामविकास अधिकारी ते उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून स्वच्छ, सुंदर गाव आणि आरोग्य संपन्न गाव बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा. एक महिन्याच्या आत सर्व ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाडी, शाळा तसेच जिल्हा परिषद शाळा यामध्ये पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्रीची मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. कार्यालयातील जुन्या कालबाह्य वस्तूचे निर्लेखन करण्याबाबतही संबंधित गटविकास अधिकारी श्रीमती मिन्नू यांनी सुचित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis