
चंद्रपूर, 31 मे (हिं.स.)।
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2026-27 करीता गोदाम बांधकामाचे जिल्ह्यास लक्षांक प्राप्त आहे. ज्या ठिकाणी गळीतधान्य पिके घेतली जातात, पण गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदाम बांधकाम करावे. 250 मे. टन गोदामाचे बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 14.40 लक्ष रुपये, यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.
सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून या घटकासाठी सरकारी-खाजगी उद्योग, समुह आधारित व्यवसाय संस्था, शेतकरी उत्पादक संस्था वा कंपनी आणि सहकारी संस्था अर्ज करू शकतात. अशा इच्छुक अर्जदार संस्थेने केंद्र शासनाच्या स्मार्ट -वखार महामंडळ यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहील. तालुका कृषी अधिकारी यांनी अशा अर्जदारांचे अर्ज पूर्वसंमतीकरिता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे 15 जुलै 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव