चंद्रनाथ रथ यांची हत्या हा सुनियोजित कट-सुवेंदू अधिकारीे
-पक्ष कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन कोलकाता, ७ मे (हिंं.स.)भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या सुनियोजित असल्याचा आरोप केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुवेंदू म्हणाले की, त्या
सुवेंदू  अधिकारीे


-पक्ष कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन

कोलकाता, ७ मे (हिंं.स.)भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या सुनियोजित असल्याचा आरोप केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुवेंदू म्हणाले की, त्यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची पूर्वनियोजित योजनेनुसार निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांनी सांगितले की, रथ यांच्या कुटुंबाची आणि जखमींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी त्यांचे पथक घेईल.

सुवेंदू म्हणाले की, या हत्येमागे राजकीय हेतू असू शकतो. पण, त्यांनी सध्या यावर भाष्य करण्यास नकार दिला. त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सिद्धनाथ गुप्ता यांच्याशी संवाद साधला. सुवेंदूयांनी दावा केला की, योग्य तपासासाठी पोलिसांकडून फुटेजसंदर्भात कोणतीही माहिती मागण्यात आलेली नाही. त्यांनी सांगितले की, तपास पोलिसांवर सोपवण्यात आला असून, गुन्हेगारांना लवकरच पकडले जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.सुवेंदू यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांना या परिस्थितीत कायदा हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन केले.

बुधवारी रात्री अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचे चालक, बुद्धदेव बेडा, हे देखील गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री सुमारे ११:१५ वाजता, चंद्रनाथ रथ मध्यमग्राम परिसरातून गाडी चालवत जात असताना, मोटारसायकलवरील अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवली. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या सूत्रांनुसार, गाडी थांबताच हल्लेखोरांनी अगदी जवळून गोळीबार सुरू केला.

चंद्रनाथ रथ यांच्या छातीत अनेक गोळ्या लागल्याने परिसरात घबराट पसरली. त्यांना तातडीने गंभीर अवस्थेत जवळच्या विवा सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चालक बुद्धदेव बेडा यांनाही गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना कोलकाता येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातमी मिळताच, सुवेंदू अधिकारी, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार आणि खासदार अर्जुन सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले. पोलीस महासंचालक गुप्ता यांनीही घटनास्थळी भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांकडून अहवाल घेतला. या हत्येनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हल्लेखोरांचा शोध तीव्र करण्यात आला.

रथावरील हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजप समर्थकांनी केला. तृणमूल काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी केली. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की लोकशाहीत राजकीय हिंसाचाराला स्थान नाही आणि दोषींना त्वरित शिक्षा झाली पाहिजे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande