कोल्हापूर जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसाबंदी जाहीर
पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांतील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्यासाठी शेतीसाठी उपसा बंदी जाहीर करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसाबंदी जाहीर


कोल्हापूर, 15 जून (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी अल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांतील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तरच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी कोल्हापूर, पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, धामणी जांभळी या नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर 15 जून पासून पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी जाहीर केली आहे.

उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करून परवाना धारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणा-या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार होणार नाही. हा आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कलम 51 (3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande