जळगाव : शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू
जळगाव, 15 जून (हिं.स.) : अमळनेर तालुक्यातील इंद्रापिंप्री येथील रहिवासी आणि प्रगतशील असलेले ५५ वर्षीय शेतकरी बन्सीलाल भटा पाटील यांचा शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली आह
जळगाव : शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू


जळगाव, 15 जून (हिं.स.) : अमळनेर तालुक्यातील इंद्रापिंप्री येथील रहिवासी आणि प्रगतशील असलेले ५५ वर्षीय शेतकरी बन्सीलाल भटा पाटील यांचा शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

बन्सीलाल पाटील हे रविवारी आपल्या शेतात नियमित काम करत असताना अचानक त्यांच्या तोल जाऊन जवळील विहिरीत पडले. घटना लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचविता आला नाही.घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही केली. या आकस्मिक घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बन्सीलाल पाटील हे शेती क्षेत्रातील कार्य आणि सामाजिक जिव्हाळ्यामुळे परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande