सोलापूर जिल्ह्यात यंदा विक्रमी 160 लाख टन ऊस गाळपाचा अंदाज
सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। यंदाच्या वर्षी समाधानकार पाऊस झाल्याने सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादनात मोठी वाढ अपेक्षीत आहे. किमान 150 ते 160 लाख टन उसाचे गाळप होईल असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान अतिवृष्टी आणि महापूरमुळे जवळपास 10 ते 15 लाख टन ऊसाचे न
ऊस गाळप


सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

यंदाच्या वर्षी समाधानकार पाऊस झाल्याने सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादनात मोठी वाढ अपेक्षीत आहे. किमान 150 ते 160 लाख टन उसाचे गाळप होईल असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान अतिवृष्टी आणि महापूरमुळे जवळपास 10 ते 15 लाख टन ऊसाचे नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी ही समोर आली आहे. आता पर्यंत सोलापूर विभागातील 40 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.

यंदा मे महिन्यापासून सतत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. वीर, भाटघर आणि उजनी धरणातून नियमीत पाणी मिळाल्याने यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनातही मोठी वाढ अपेक्षीत आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या हंगामात किमान 40 लाख टनांनी वाढ होईल असा अंदाज सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीबरोबरच सीना आणि भीमानदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या जवळपास 10 ते 15 लाख टन ऊसाचे नुकसान झाले आहे. तरीही यंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात विक्रमी 160 लाख टना पर्यंत उसाचे गाळप होईल असा अंदाज आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी मागील हंगामातील एफआरपीची रक्कम दिली आहे. मातोश्री, गोकुळ,सिध्देश्वर, जयहिंद, वसंतराव काळे या कारखान्यांकडे काही प्रमाणात एफआरपीची रक्कम थकीत आहे. दरम्यान राज्य सरकार आणि साखर आयुक्तांच्या मान्यते कोणत्याही खाजगी कंपनीला कारखाना भाडेतत्त्वावर देऊ नये अशी लेखी नोटीस भाळवणी (ता.पंढरपूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला दिल्याचेही साखर सह संचालकांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande