...तर मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार ! - राहुल नार्वेकर
नागपूर, 13 डिसेंबर (हिं.स.) - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत आले, तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तर देण्यात आलेली नाही. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर १४ डिसेंबर या दिवशी स
...तर मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार ! - राहुल नार्वेकर


नागपूर, 13 डिसेंबर (हिं.स.) - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत आले, तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तर देण्यात आलेली नाही. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर १४ डिसेंबर या दिवशी सभागृहाची बैठक संपेपर्यंत या लक्षवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाही, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

याविषयी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. कोणत्याही अधिकार्‍याला असे वाटत असेल की, विधीमंडळाच्या पीठासीन अधिकार्‍यांनी दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक नाही, तर त्यावर कारवाई केली जाईल. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत सभागृहाच्या पटलावर प्रलंबित लक्षवेधींची उत्तरे आली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाची कारवाई केली जाईल, असा त्यांनी इशारा दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande