
रत्नागिरी, 12 जानेवारी, (हिं. स.) : राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींनी अभिवादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी