जळगावकरांना अतिसूक्ष्म धूलिकणांचा धोका वाढला
जळगाव, 28 मार्च (हिं.स.) दिवसेंदिवस प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असून जळगावकरांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात जळगावकरांना अतिसूक्ष्म धूलिकणांचा धोका वाढला असून यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आय क्यू एअर य
जळगावकरांना अतिसूक्ष्म धूलिकणांचा धोका वाढला


जळगाव, 28 मार्च (हिं.स.) दिवसेंदिवस प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असून जळगावकरांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात जळगावकरांना अतिसूक्ष्म धूलिकणांचा धोका वाढला असून यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आय क्यू एअर या स्विस कंपनीने सादर केलेल्या सन 2025 च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालामध्ये जळगावचे नाव अग्रक्रमावर आले आहे. महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव आणि बेलापूरसारख्या शहरातील पीएम 2.5 (अतिसूक्ष्म धूलिकण)चे प्रमाण धोकादायक असल्याचे हा अहवाल सांगतो. पर्यावरण आणि आरोग्यासाठी सर्वाधिक घातक असलेल्या अतिसूक्ष्म धूलिकणांचा (पीएम 2.5) जळगावात प्रसार वाढता आहे. शहरासह जिल्हाभरात प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यावर उपाययोजना मात्र शून्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात विविध प्र्रकारच्या प्रदूषणाचा विळखा पडत असतांनाही प्रशासकीय पातळीवर यावर उपाययोजना शून्य होतांना दिसत आहे. कचरा, अतिसूक्ष्म धूलिकण, रस्त्याच्या कडवर असलेल्या विट भट्ट्या, वाळूचा उपसा हे प्रदूषण वाढवित असतांनाही त्यावर कठोर कारवार्इ होतांना दिसत नाही.

वाढत्या वायुप्रदूषणामुळे जळगावकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) चे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब ठरत असून, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आय क्यू एअर या स्विस संस्थेच्या 2025 च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालात जळगावचे नाव धोकादायक शहरांमध्ये समोर आले आहे. या अहवालामुळे प्रशासनासह नागरिकांमध्येही खळबळ उडाली आहे.

अहवालानुसार, जळगाव शहरात पीएम 2.5 या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. हे धूलिकण इतके सूक्ष्म असतात की ते थेट फुफ्फुसात प्रवेश करतात आणि रक्तप्रवाहात मिसळून विविध गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा जळगावातील प्रदूषणाची पातळी खूपच जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.जळगाव शहरासह ग्रामीण भागातही प्रदूषणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या विटभट्ट्या, बांधकामातून उडणारी धूळ, कचऱ्याचे खुले जाळणे, वाळू उपशामुळे निर्माण होणारी धूळ यामुळे वातावरणात प्रदूषण वाढत आहे. मात्र या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहेे. प्रदूषण नियंत्रणासाठी नियम असले तरी त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यावर कठोर कारवाईचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande