सामाजिक नेतृत्व विकासात प्रशासन, राजकारणाचा अडसर - कृष्णा भोगे
छत्रपती संभाजीनगर, 06 मार्च, (हिं.स.)। पंचायतराज त्रिस्तरीय रचनेनंतर ग्रामीण भागात राजकीय नेतृत्व मोठया प्रमाणावर विकसित झाले. मात्र सामाजिक नेतृत्व विकसीत होताना प्रशासन, राज्यकर्ते नेहमीच अडसर ठरले आहेत, असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त कृष्णा भ
Q


छत्रपती संभाजीनगर, 06 मार्च, (हिं.स.)। पंचायतराज त्रिस्तरीय रचनेनंतर ग्रामीण भागात राजकीय नेतृत्व मोठया प्रमाणावर विकसित झाले. मात्र सामाजिक नेतृत्व विकसीत होताना प्रशासन, राज्यकर्ते नेहमीच अडसर ठरले आहेत, असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी केले. ग्रामविकासाची सारी सूत्रे आजही राज्य-केंद्र शासनाच्याच हाती असून सत्तेचे विकेंद्रीकरण ख-या अर्थाने झालेच नाही, असेही ते म्हणाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संत गाडगेबाबा ग्रामीण समस्या संशोधन केंद्र, राज्यशास्त्र विभागव ''इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ' स्थानिक शाखा या संस्थांच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विभागाच्या सभागृहात उदघाटन कार्यक्रम झाला. यावेळी डॉ.एम.एम.सेमवाल, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, डॉ.अभिजीत पिलखाणे, डॉ.शुजा शाकीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी कृष्णा भोगे यांचे बीजभाषण झाले. ते म्हणाले १९७३ च्या घटना दुरुस्तीनंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हाच स्थानिक संस्था मोठे अधिकार मिळाले. मात्र आजही या संस्थाचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्यामुळे त्यांना निधीसाठी शासनावर अवलंबून रहावे लागते. या धोरणांवर राजकीय अर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. विशेषतः नोकरशहांची नकारत्मक मानसिकता व व्यवस्थेतील भ्रष्टाचार यास कारणीभूत आहे. पोपटराव पवार यांच्या सारखे अपवादात्मक सामाजिक नेत्तृत्व विकसीत झाले व ख-या अर्थाने सत्तेचे विकेंद्रीकरण झाले तरच ग्रामविकास होईल, असेही ते म्हणाले. तर उत्तराखंड येथील प्रा.एम.एम.सेमवाल यांनी ’पीपीटी’च्या माध्यमातून राज्याची चौफेर प्रगती मांडले. या परिसंवादाचा अहवाल व शिफारशी राज्यशासनास पाठविण्यात येतील, असे संयोजक डॉ.प्रशांत अमृतकर म्हणाले.डॉ.सत्यपाल कांबळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.अभिजीत पिलखाने यांनी आभार मानले. दिवासभातील विविध सूत्रसंचालन तर डॉ.अभिजीत विचाराने यांनी आभार मानले. परिसंवादासाठी डॉ.सविता नागे, रोहित ठोसर, लक्ष्मीकांत कुरंगळ, महेश शिंदे, रविराज काळे आदींनी प्रयत्न केले.

विविध सत्रात शंभरहून अधिक विद्यार्थी संशोधक व तज्ज्ञांनी सहभाग घेतला. 'ग्रामीण विकास धोरणे आणि प्रशासकीय आव्हाने' या पहिल्या चर्चासत्रात गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, ग्रामसेवक विवेकानंद गिरी, तलाठी रवी लोखंडे हे सहभागी झाले. तर दुपारच्या सत्रात ' ताळागाळातील नेतृत्व आणि समुदाय सहभाग' या या विषयावर माजी सरपंच बळीराज जाधव, विलास दहिभाते व डॉ.जितेंद्र वासनिक यांनी सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande