ग्रामीण पोलीस दलाच्या पुढाकारातून जिल्ह्यात ऑरगॅनिक शेतीला चालना - सोलापूर पालकमंत्री
सोलापूर, 02 मे (हिं.स.)। ग्रामीण पोलीस दलाच्या विशेषता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यात वृक्ष लागवडी बरोबरच ऑरगॅनिक शेतीला प्राधान्य दिले जात आहे. पोलीस विभाग जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांच्या माध्यमातून ग्रामीण भाग
gdsf


सोलापूर, 02 मे (हिं.स.)। ग्रामीण पोलीस दलाच्या विशेषता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यात वृक्ष लागवडी बरोबरच ऑरगॅनिक शेतीला प्राधान्य दिले जात आहे. पोलीस विभाग जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना ऑरगॅनिक शेतीचे महत्व सांगून ती शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. सध्या शेतीचे उत्पादन वाढवणे तसेच शेती पिकाला कीड लागू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर रसायने फवारली जात आहेत, त्यातून कॅन्सर सारख्या आजाराचे प्रमाणात वाढ झाल्याचे निर्देशनास आलेले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस दलाने ऑरगॅनिक शेतीला दिलेली चालना हा एक चांगला उपक्रम असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

ग्रामीण पोलीस विभागाकडून पोलीस मुख्यालयाच्या शेजारी पेट्रोल पंप चालवला जातो त्या ठिकाणी आयोजित ऑरगॅनिक भाज्या व फळांच्या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, पोलीस विभागाकडून विषमुक्त शेती करण्याचा संदेश दिला जात आहे. त्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन सेंद्रिय शेतीकडे वळावे. त्याप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी येथे सुरू असलेल्या सेंद्रिय भाज्या व फळांच्या स्टॉलला भेट देऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचे आवाहन ही यावेळी त्यांनी केले. प्रारंभी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगून जिल्ह्यातील शेतकरी यासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत तसेच अशा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाज्या व फळाला बाजारपेठ मिळावी म्हणून ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande