आठ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान
मुंबई, 26 एप्रिल, (हिं.स.) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल
आठ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान


मुंबई, 26 एप्रिल, (हिं.स.) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वर्धा - ४५.९५ टक्के

अकोला -४२.६९ टक्के

अमरावती - ४३.७६ टक्के

बुलढाणा - ४१.६६ टक्के

हिंगोली - ४०.५० टक्के

नांदेड - ४२.४२ टक्के

परभणी -४४.४९ टक्के

यवतमाळ - वाशिम -४२.५५ टक्के

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande