राज्यात आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान
मुंबई, २६ एप्रिल (हिं.स.) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २
राज्यात आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान


मुंबई, २६ एप्रिल (हिं.स.) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

वर्धा - ३२.३२ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती - ३१.४०टक्के

बुलढाणा - २९.०७ टक्के

हिंगोली - ३०.४६ टक्के

नांदेड - ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

यवतमाळ - वाशिम -३१.४७ टक्के

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande