भारतात परतण्यापूर्वी रोहित शर्माची भावनिक पोस्ट
कॅनबेरा, 26 ऑक्टोबर (हिं.स.) - ऑस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने शानदार कामगिरी केली आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, हिट
रोहित शर्माची भावनिक पोस्ट


कॅनबेरा, 26 ऑक्टोबर (हिं.स.) - ऑस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने शानदार कामगिरी केली आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, हिटमॅनने केवळ आपल्या संघाला विजय मिळवून दिला नाही तर संस्मरणीय शतकासह त्यांना क्लीन स्वीपपासून वाचवले. रविवारी मायदेशी परतण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट पोस्ट केली. त्याने लिहिले, सिडनीला शेवटचा निरोप देत आहे.

सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दमदार कामगिरीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ४६.४ षटकांत २३६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने शतक आणि कोहलीने अर्धशतक झळकावले होते. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १६८ धावांची नाबाद भागीदारी केली होती. ज्यामुळे भारताला ३८.३ षटकांत १ बाद २३७ धावांपर्यंत मजल मारता आली. पण ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.

सामन्यानंतर, रोहित आणि कोहलीने ऍडम गिलख्रिस्ट आणि रवी शास्त्री यांच्याशी विशेष संवाद साधला. ऑस्ट्रेलियात येऊन येथे खेळणे नेहमीच आनंददायी असते. २००८ च्या माझ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मला माहित नाही की, आपण कधी ऑस्ट्रेलियात परत येऊ की नाही. आपण कितीही कामगिरी केली तरी आपण आपल्या क्रिकेटचा आनंद घेतो. पर्थमध्ये आपण एका नवीन आयुष्याची सुरुवात केल्याचे, रोहित म्हणाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande