लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार नाही?
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर (हिं.स.)भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेहमीच उत्साहाने भरलेला असतो, मग तो आशिया कप असो किंवा आयसीसी स्पर्धा असो. पण २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमधील संभाव्य क्रिकेट सामन्यात हा रोमांचक सामना दिसणार नाही. हे आयसीसीने ठरवलेल्य
भारत आणि पाकिस्तान संघ


नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर (हिं.स.)भारत आणि पाकिस्तानमधील सामना नेहमीच उत्साहाने भरलेला असतो, मग तो आशिया कप असो किंवा आयसीसी स्पर्धा असो. पण २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमधील संभाव्य क्रिकेट सामन्यात हा रोमांचक सामना दिसणार नाही. हे आयसीसीने ठरवलेल्या नवीन पात्रता नियमांमुळे आहे. ज्यामुळे पाकिस्तानला ऑलिंपिकमध्ये स्थान मिळवणे जवळजवळ अशक्य झाले आहे.

नवीन नियमांमुळे परिस्थिती कशी बदलेल?

दुबई येथे झालेल्या नुकत्याच झालेल्या बोर्ड बैठकीत आयसीसीने स्पष्ट केले की, पुरुष आणि महिला दोन्ही गटात फक्त सहा संघ सहभागी होतील. ही निवड आयसीसी टी२० क्रमवारीवर आधारित नसून, त्याऐवजी, प्रत्येक खंडातून (आशिया, युरोप, आफ्रिका, ओशनिया इ.) एक संघ निवडला जाईल. सहावा संघ जागतिक पात्रता फेरीद्वारे निश्चित केला जाणार आहे.

या नियमानुसार आशियातील फक्त एका संघाला थेट स्थान मिळेल आणि सध्या तो संघ भारत आहे. जो सध्या टी२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत ऑलिंपिकसाठी पात्र होण्यासाठी पाकिस्तानला एकतर ग्लोबल क्वालिफायर जिंकावे लागेल, किंवा आयसीसीला आशियातील दोन संघांना परवानगी द्यावी लागेल.

सध्याच्या रचनेनुसार, संभाव्य संघ खालीलप्रमाणे :

आशियान : भारत

ओशनिया : ऑस्ट्रेलिया

युरोप : इंग्लंड

आफ्रिका : दक्षिण आफ्रिका

अमेरिका (यजमान) : अमेरिका

जागतिक क्वालिफायर : आणखी एक संघ (वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान)

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande