मुंबई, 20 एप्रिल, (हिं.स.)। मुंबईकरांची पुढच्या 25 वर्षाची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला कालच मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार व्यक्तं करण्यासाठी “धन्यवाद देवेंद्रजी” अशी अभिनंदन स्वाक्षरी मोहीम कांदिवली पूर्व विधानसभेतस्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी राबवली. महाविकास आघाडी सरकारने पर्यावरणाच्या नावाखाली गारगाई धारण रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी या निर्णयाचे वर्णन 'शुद्ध वेडेपणा' या शब्दात केला होता, याची देखील आठवण भातखळकर यांनी करून दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर