रत्नागिरी, 3 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमधील ६२ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
केंद्र सरकारअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ८० पैकी ६२ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमाचे हे यश असल्याचे सिद्ध झाले आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी संख्येचा आलेख चढता आहे. गतवर्षी ५१ विद्यार्थी निवडले गेले होते. यावर्षी ती संख्या ६२ वर गेली आहे.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी