अकोला, 20 मे (हिं.स.)। वेदरत्न आचार्या सवितादेवी च्या ब्रह्मत्वात संचालित पाणिनि प्रभात कन्या महाविद्यालय- गुरुकुल, दम्माईगुडा, हैद्राबाद मध्ये बालिकांच्या सशक्तिकरण व सर्वांगीण उन्नती करिता 15 दिवसीय आर्य वीरांगणा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
संस्कृति संवर्धन संघ हिवरखेड च्या निशा टावरी, नवल टावरी , वर्षा व शांतिलाल गोमाशे, पंकज राठी, विलास घुंगड सर, विनय कुमारजी राठी, चंद्रशेखर बोहरा इत्यादीच्या अथक प्रयत्नानी व मार्गदर्शनाने हिवरखेड व बेलखेड येथील कु.श्रावणी मनीष वानखेड़े, कु.अमृता सुनील अस्वार, कु.देवयानी रविन्द्र गांवडे, कु.वैष्णवी दिपक भटकर, कु.पायल संदिप भटकर, कु.अनुष्का शांतिलाल गोमाशे, कु.वैष्णवी मंगेश गांवडे, कु.पुजा छत्रपति राऊत, इत्यादीनी सहभाग घेतला. आचार्य सविताजी वेदरत्न द्वारे सत्य सनातन वैदीक संस्कृति, अग्निहोत्र, राष्ट्र भक्ति, जीवन मुल्य, गीत गायन संदर्भात मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. आणि व्यायामाचार्य श्री शैलजी आर्य द्वारे सर्वांग सुंदर व्यायाम, सूर्य नमस्कार, भूमि नमस्कार, विविध योगासन, पिरामिड व अन्य शारीरिक प्रशिक्षण दिले. मान्यवर मंडळी च्या उपस्थितित आयोजित समापन समारोहात सर्व बालिकांचे प्रात्यक्षिक पाहुन हैदराबाद येथील दर्शकांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. वैदिक विदुषी आचार्य निर्मला देवी तथा आचार्या सविताजी, आचार्य शैलजानी सर्व बालिकांना आशीर्वचन सोबतच आर्य वीरांगणा च्या उपाधि देऊन सन्मानित व गौरवान्वित केले. हिवरखेड व बेलखेड च्या आर्य वीरांगनांनी आपली सांस्कृतिक धरोहर, राष्ट्रप्रेम च्या प्रति पुर्ण निष्ठा व समर्पण भावना द्वारे आगामी जीवन व्यतीत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
विश्व मांगल्य सभा, राष्ट्रीय सह संगठक कु. गायत्रीताई लोमटे ने सभी बालिकांचे उत्साह वर्धन करुन जीवन उत्कर्षा करिता काही सुत्र देऊन संबोधित केले. सरते शेवटी सौ.निशा एवं नवल टावरी च्या नेतृत्वात भाग्यनगर मध्ये शिल्पराम ग्राम, हायटेक सीटी, बिरला राम मंदिर, आदि चे भ्रमण व दर्शन करुन सर्व आर्य वीरांगना अत्याधिक आनंदित व उल्हासित झाल्यात.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे