सोलापूर, 1 जून (हिं.स.)।
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील धनगर समाजाने विश्वास ठेवून महायुतीला मतदान केले. राज्यात देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आले, तरीपण धनगर आणि ओबीसी समाजाचे प्रश्न सुटत नाहीत. उलट समाजाची अडवणूक केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीला मतदान केले, पण त्यांनीही आमचा विश्वासघात केला, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.
लक्ष्मण हाके पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीवर निशाणा साधला.
लक्ष्मण हाके म्हणाले की, धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. अजूनही राज्य सरकारने धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे, अशी केंद्राकडे शिफारस केली नाही.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड