रत्नागिरी, 15 जून, (हिं. स.) : राजापूर तालुक्यात आडिवरे येथे पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाहणी केली.
श्री. सावंत यांनी राजापूर येथील महाकाली मंदिराला भेट दिली. प्रशासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार यांच्या भेटी घेण्यात आल्या व तेथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधितांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सादर करावे, अशा सूचना दिल्या.
यावेळी प्रदेश पदाधिकारी शिल्पा मराठे, जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, बाळ दाते, वसंत पाटील, धनंजय मराठे, मंदार खंडकर, राजेंद्र फाळके, समीर सावंत तेथील स्थानिक ग्रामस्थ भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते स्थानिक सरपंच उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी