शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांनी साधला रविवारचा मुहूर्त, स्टेशनरीच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी
नाशिक, 15 जून (हिं.स.)। जून महिना लागला की, विद्यार्थ्यांना नवीन वर्गाची चाहूल लागते. त्यासाठी सर्वच शालेय वस्तू नवीन असाव्या असा आग्रह पाल्य आपल्या पालकांकडे धरताना दिसतो. त्याअनुषंगाने सोमवार दि. १६ जून रोजी जिल्ह्यातील बऱ्याचशा शाळा सुरु होणार अस
शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांनी साधला रविवारचा मुहूर्त, स्टेशनरीच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी


नाशिक, 15 जून (हिं.स.)।

जून महिना लागला की, विद्यार्थ्यांना नवीन वर्गाची चाहूल लागते. त्यासाठी सर्वच शालेय वस्तू नवीन असाव्या असा आग्रह पाल्य आपल्या पालकांकडे धरताना दिसतो. त्याअनुषंगाने सोमवार दि. १६ जून रोजी जिल्ह्यातील बऱ्याचशा शाळा सुरु होणार असल्याने शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांनी रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधला. त्यामुळे शहरातील सर्वच बाजारपेठा विद्यार्थी आणि पालकांनी फूलून गेल्याचे बघायला मिळाले. शहरातील मेनरोड भागातील दुकाने शालेय वस्तूंनी सजली आहेत.

या भागात पालकांची आणि विद्यार्थ्यांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. शहरातील दुकानांमध्ये दप्तर, पेन्सिल, कंपासपेटी, पुस्कांचे कव्हर, वह्या, पुस्तके, बूट, पेन, रेनकोट, छत्री, जेवणाचा डबा, वॉटरबॅग यांच्याबरोबरच गणवेश खरेदी करण्यासाठी छोट्या दुकानांबरोबरच शोरूममध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी नजरेस पडत आहे. त्यातच पालकांची होणारी धावपळ लक्षात घेवून यंदा बऱ्याचशा दुकानदारांनी शाळेसाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू विक्रीसाठी ठेवल्याने पालकांना एकाच दुकानात सर्व वस्तू मिळत असल्याने दमछाक कमी झाली आहे.

असे आहेत दर

वही १८० ते २००

कंपास २०० ते ३५०

चित्रकला वही ५० ते ८०

दप्तर १५० ते ९५०

छत्री १५० ते २५०

रेनकोट २०० ते ७००

कंपास बॉक्स ५० ते ४५०

पेन्सिल ५० रु डझन

बूट १५० ते ७००

पॅड ६० ते १५०

सर्वच वस्तू विक्रीसाठी उपलब्ध

शाळा सुरु होण्यास एकच दिवसाचा कालावधी राहिल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यावाचून पालकांकडे पर्याय राहिला नाही. तसेच रविवारचा सुटीचा दिवस असल्याने सर्वच दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. वर्षभर लागणाऱ्या सर्वच वस्तू खरेदी करण्याकडे पालकांचा कल वाढल्याने सर्वच वस्तू वुक्रीसाठी ठेवल्या आहेत.

भारत महाले दुकानदार

दरवर्षी नवीन खरेदी

मागील वर्षाच्या वस्तू कितीही चांगल्या असल्या तरी मुलांना प्रत्येक वर्षी नवीनच लागतात. त्यात शाळाही प्रत्येक वर्षी गणवेश, बूट आणि मोज्यांमध्ये थोडाफार बदल करतात. परिणामी दरवर्षी नवीन खरेदी करावी लागत असल्याने त्याची खिशाला झळ बसते. - रवी जाधव, ग्राहक

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande