मनमाड, 2 जून (हिं.स.)।
: मनमाड जंक्शन स्थानक असून, रोज काहीना काही घटना घडत असतात. रेल्वेच्या ब्रिजवर एक तरुण चढला. तो तरुण कोण आहे, का चढला, याबाबत काहीच माहिती नाही. सकाळी सव्वाआठ ते साडेआठदरम्यान मोठी गर्दी असते. याचवेळी तो ब्रिजवर चढला. त्यामुळे मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकाचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनमाड जंक्शन स्थानकावरील ही चौथी घटना आहे.
मनमाड जंक्शन स्थानकावर दिवसभरात हजारो शेकडो रेल्वे गाड्यांची ये-जा होते. हजारो प्रवासी मनमाड शहरातून येतात. यातून अनेकदा मनोरुग्ण किंवा गुन्हेगारी स्वरूपातील प्रवासीही असतात. काही महिन्यांपूर्वी मनोरुग्ण रेल्वे गाडीच्या छतावर उभे राहून हायव्होल्टेज वायरला पकडून घेतले. याआधी
एका प्रवाशाने सहप्रवाशांवर अॅसिड हल्ला केला होता. अशा एकना अनेक घटना मनमाड शहरातील रेल्वेस्थानकावर घडलेल्या आहेत. काल रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान गोदावरी एक्स्प्रेसच्या वेळेत एक तरुण रेल्वे ओव्हरब्रिजवर चढला. रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी जाऊन बसला. हा सर्व प्रकार प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. तरुण बराच वेळ तेथे बसला. यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. तरुणाला काढण्यासाठी शिडी लावली. मात्र, आपल्याकडे लोक येत असल्याचे बघून तो तरुण ज्या मार्गे वर चढला होता, त्याच मार्गाने पुन्हा पळून गेला. मुळात हा प्रकार घडला हे चुकीचे आहे. या सर्व प्रकारामुळे मनमाड रेल्वेस्थानकाची सुरक्षितताही नेमकी कोणाच्या भरोशावर आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI