रत्नागिरी : प्रत्येक ग्रामपंचायतीत ११ जुलैपासून आर्थिक समावेशन योजना शिबिर
रत्नागिरी, 1 जुलै, (हिं. स.) : येत्या ११ जुलैपासून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत आर्थिक समावेशन योजना शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय वित्त मंत्रालय वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबाबत शासन
रत्नागिरी : प्रत्येक ग्रामपंचायतीत ११ जुलैपासून आर्थिक समावेशन योजना शिबिर


रत्नागिरी, 1 जुलै, (हिं. स.) : येत्या ११ जुलैपासून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत आर्थिक समावेशन योजना शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालय वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबाबत शासन योजनांचा लाभ पोहोचावा, या उद्देशाने 3 महिन्यांच्या कालावधीत आर्थिक समावेशन योजनेच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ जुलै ते २६ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शिबिर होईल. ही माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, अटल पेन्शन योजनेअंतर्गत नोंदणी तसेच प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक खाती उघडणे व बँक खाती असलेल्या लाभार्थ्यांची रि-केवायसी करणे आदी उपक्रम या शिबिरांमधून ग्रामपंचायतीमध्ये राबविले जाणार आहेत. १० वर्षांतून एकदा रि-केवायसी करावी लागते. जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात 11, 18 व 25 तारखेला, ऑगस्ट महिन्यात 1, 8, 22,29 आणि सप्टेंबर महिन्यात 12, 19 व 26 तारखेला ही शिबिरे होणार आहेत. या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी लाभार्थ्यांनी या शिबिरांचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande