लंडन, 2 जुलै (हिं.स.) :
नाणेफेक
गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर भारतीय संघाने २० षटकांत चार फलंदाज गमावून १८१
धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज आणि अमनजोत कौर यांनी अर्धशतके झळकावली. त्याच वेळी, रिचा घोषने शेवटी तुफानी खेळी केली.
प्रत्युत्तरादाखल, इंग्लंड संघ २० षटकांत सात गडी मावून
केवळ १५७ धावाच करू शकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या सामन्यात
उतरला. ती गेल्या सामन्यात खेळली नव्हती.
भारत
आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी टी-२० सामना आता ४ जुलैला रंगणार आहे. हा सामना
जिंकत हरमनीप्रीक कौरचा संघ मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेण्याच्या उद्देशानेच
मैदानात उतरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra