कोण आहे सारांश जैन? भारतीय कसोटी संघात पहिल्यांदाच स्थान
नवी दिल्ली 28 जुलै (हिं.स.)श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. पण त्यांची उपलब्धता बीसीसीआयच्या समितीच्या मंजुरीवर अवलंबून आहे. ऑफ-स्पिनर आणि अष्टपैलू क्रि
सारांश जैन


नवी दिल्ली 28 जुलै (हिं.स.)श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. पण त्यांची उपलब्धता बीसीसीआयच्या समितीच्या मंजुरीवर अवलंबून आहे. ऑफ-स्पिनर आणि अष्टपैलू क्रिकेटपटू सारांश जैनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर, सारांश जैनने अखेर कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले आहे. ५४ सामन्यांमधील ८५ डावांमध्ये त्याने ३१.७६ च्या सरासरीने २२२३ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीमध्ये त्याने २७.३१ च्या सरासरीने १८८ बळी घेतले आहेत, ज्यात एका डावात पाच किंवा अधिक बळी घेण्याच्या १० कामगिरींचा समावेश आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीने वेधले लक्ष

३१ मार्च १९९३ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेल्या सारांश जैनने अलीकडेच आपल्या दोन देशांतर्गत हंगामांमध्ये अपवादात्मक कामगिरी केली आहे. २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफीमध्ये, सारांशने मध्य प्रदेशकडून खेळताना केवळ सात सामन्यांमध्ये २.६४ च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने ३० बळी घेतले. मागील हंगामातही त्याने आठ सामन्यांमध्ये ३५ बळी घेतले होते. २०२५ च्या दुलीप ट्रॉफीमध्येही सारांशची चमक दिसून आली. अंतिम सामन्यात सेंट्रल झोनकडून खेळताना त्याने साऊथ झोनविरुद्ध पाच बळी घेतले. तसेच इराणी ट्रॉफीमध्ये त्याने रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध सहा बळी घेतले.

वडिलांकडून गिरवले क्रिकेटचे धडे, एक चिठ्ठी बनली प्रेरणा

सारांशच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. जेव्हा तो मध्य प्रदेश संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता, तेव्हा त्याच्या वडिलांना तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाले. कुटुंबाने ही गोष्ट सारांशपासून गुप्त ठेवली. सारांशने केवळ त्याच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती. उपचारादरम्यान, त्याचे वडील बोलू शकत नव्हते. म्हणून, त्यांनी एका चिठ्ठीवर लिहिले, फक्त तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर, मी लवकरच बरा होईन. हा संदेश आजही सारांशसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. एका मुलाखतीत जैनने हा प्रसंग सांगितला, ज्यावरून हे दिसून येते की त्याच्या संपूर्ण खेळाच्या कारकिर्दीत त्याच्या कुटुंबाने त्याला किती पाठिंबा दिला आहे. जैनच्या वडिलांनी त्याला एक चिठ्ठी दिली होती, ज्यावर लिहिले होते, बाळा, मी आता ठीक आहे. तू जर चांगला खेळलास, तर मी लवकर बरा होईन.

सारंश प्रशिक्षक गंभीरच्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता

भारतीय संघ बऱ्याच काळापासून एका ऑफ-स्पिनरच्या शोधात होता आणि अखेरीस सारांशची निवड झाली आहे. सारांश भारतासाठी एक मौल्यवान ऑफ-स्पिनर ठरू शकतो. भारताकडे भरपूर लेग-स्पिनर्स आहेत, पण एका अस्सल ऑफ-स्पिनरची उणीव आहे. हरभजन सिंगनंतर, बऱ्याच काळापासून भारतासाठी खेळलेला एकही ऑफ-स्पिनर झालेला नाही. आता, सारांश संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे. सारांश आपल्या फलंदाजीचे कौशल्यही दाखवू शकतो. त्यामुळे, गंभीरच्या रणनीतीसाठी सारांश एक उत्तम पर्याय आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande