भारत तालिबानच्या माध्यमातून पाकिस्तानला लक्ष्य करतोय - पाक संरक्षणमंत्री
इस्लामाबाद, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता यासाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अ
भारत तालिबानच्या माध्यमातून पाकिस्तानला लक्ष्य करत आहे- पाक संरक्षणमं


इस्लामाबाद, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता यासाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानवर भारतासाठी प्रॉक्सी वॉर लढण्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भारत तालिबानच्या माध्यमातून पाकिस्तानला लक्ष्य करत आहे. यावर अद्याप भारत सरकारकडून अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या दोन्ही देशांनी ४८ तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.

एका टीव्ही मुलाखतीमध्ये ख्वाजा आसिफ म्हणाले, “सध्या काबूल हे दिल्लीसाठी प्रॉक्सी वॉर लढत आहे.”ख्वाजा आसिफ यांनी युद्धविरामाबाबत संशय व्यक्त करत म्हटलं, “मला शंका आहे की हा युद्धविराम टिकेल, कारण तालिबानला दिल्लीकडून पाठिंबा मिळत आहे.”त्यांनी इशारा दिला की, “जर अफगाणिस्तानने तणाव वाढवला किंवा युद्धाचा विस्तार केला, तर पाकिस्तान सैनिकी कारवाईसाठी पूर्णपणे सज्ज आहे.” तथापि, त्यांनी संवादाची शक्यता अजूनही खुली असल्याचंही नमूद केलं. आसिफ यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि भारत यांच्यातील अलिकडच्या बैठकीवरही प्रश्न उपस्थित केले. 'तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांचा अलिकडचा सहा दिवसांचा भारत दौरा हा एक नियोजित कार्यक्रम होता, असंही आसिफ म्हणाले.

दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाण तालिबान अखेर ४८ तासांच्या युद्धविरामावर सहमत झाले आहेत. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानुसार, हा युद्धविराम बुधवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून लागू झाला आहे. हा निर्णय सीमेवरील अलीकडच्या तीव्र गोळीबारानंतर घेण्यात आला. याआधी, दोघांमधील लढाई केवळ सीमेवरच मर्यादित न राहता आता अंतर्गत भागांवरही हल्ले करण्यापर्यंत पोहोचली होती. यामध्ये पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधील अनेक रहिवासी भागांवर हल्ले केले आणि काबूल व कंधारवर हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील सीमा संघर्षांमध्ये दोन्ही बाजूंनी अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande