रत्नागिरीत दिवाळीत 5 दुकानांवर कारवाई, एकाचा परवाना निलंबित
रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अन्नात भेसळ होऊ नये, तसेच ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई, अन्न मिळावे म्हणून अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी कार्यालयाच्या वतीने एकूण 20 विशेष
रत्नागिरीत दिवाळीत 5 दुकानांवर कारवाई, एकाचा परवाना निलंबित


रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अन्नात भेसळ होऊ नये, तसेच ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई, अन्न मिळावे म्हणून अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी कार्यालयाच्या वतीने एकूण 20 विशेष तपासण्या करून 16 अन्न नमुने घेण्यात आले होते. मिठाईत भेसळ केल्या प्रकरणी 5 दुकानांवर कारवाई करून 38 हजारांचा दंड वसूल करण्यात आला, तर एक दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनच्या वतीने देण्यात आली आहे.

नागरिकांकडून मिठाई तसेच अन्न पदार्थ दूध, खवा, मावा, रवा, मैदा, आटा, खाद्य तेल यांची मोठी मागणी असते. त्यांना भेसळयुक्त पदार्थ मिळू नयेत, यासाठीदरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. 20 विशेष तपासण्या करण्यात आल्या. 16 अन्न नमुने घेण्यात आले. त्यामध्ये मिठाई, खवा, खाद्यतेल, पनीर, पोहा, चिवड इ. नमुने घेऊन लॅबमध्ये टेस्ट करण्यात आले. त्यातून दोषींवर कारवाई करण्यात आली.

सणासुदीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात 196 अन्न परवाने देण्यात आले असून 771 नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तपासणी सुरू आहे. अन्न पदार्थाच्या दर्जाविषयी ग्राहकांना कोणत्याही प्रकारची तक्रारी असल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे सूचित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande