फटाक्यांमुळे रोजच्या ‎तुलनेत अडीच पट वाढले प्रदूषण‎
सर्वाधिक परिणाम रात्री 8 ते 10 या वेळेत; इतर वेळेत 125 एक्यूआय‎ अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावरून ‎(एक्यूआय) एखाद्या शहराचे वायू‎प्रदूषण किती आहे, हे ठरवले जाते.‎अमरावती शहराचा एक्यूआय‎ सरासरी १२५ असतो. पण दिवाळीच्या‎
Diwali crackers increase pollution by 2.5 times compared to daily levels: Results between 8 and 10 pm; AQI was 125 at other times


सर्वाधिक परिणाम रात्री 8 ते 10 या वेळेत; इतर वेळेत 125 एक्यूआय‎

अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।

हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावरून ‎(एक्यूआय) एखाद्या शहराचे वायू‎प्रदूषण किती आहे, हे ठरवले जाते.‎अमरावती शहराचा एक्यूआय‎ सरासरी १२५ असतो. पण दिवाळीच्या‎ दिवशी फोडल्या गेलेल्या‎ फटाक्यांमुळे रात्री आठ ते दहा या‎वेळात तो तब्बल अडीच पट वाढून ‎३१४ वर पोहाेचला होता. ही बाब ‎शास्त्रीयदृष्ट्या ‘व्हेरी पुअर’ या ‎व्याख्येत मोडते. त्यामुळे त्या दोन‎ तासांत आजारी नागरिकांना श्वास‎ घेण्यासाठी काहीसा त्रास जाणवला‎ असेल, असे महाराष्ट्र प्रदूषण ‎नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी)‎म्हणणे आहे.‎

या वर्षीच्या दिवाळीला ‎मंगळवारी रात्री शहराच्या अनेक ‎भागात धुराचे लोट उठताना दिसले.‎हे लोट फटाके फाेडल्यामुळे ‎निघालेल्या धुरांचे होते. त्यामुळे ‎रात्रीच्या वेळी वायू प्रदूषणात‎ बऱ्यापैकी वाढ झाली होती. येथील‎ शिवाजी महाविद्यालयाच्या हवामान‎ केंद्राने या वायू प्रदूषणाची नेमकी ‎मोजदाद केली आहे. दरम्यान नागपूर ‎येथील हवामान खात्याचे स्थानिक‎ अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण‎ नियंत्रण मंडळाने देखील या ‎आकड्यांना दुजोरा दिला असून,‎मंगळवारच्या रात्री अमरावतीचे‎ आकाश काही काळासाठी ३०१ ते ४०० च्या दरम्यानच्या ‘व्हेरी‎पुअर’ या व्याख्येत पोहोचले होते. शहराचा‎ मुख्य परिसर असलेल्या अंबागेटच्या आतील‎ जुने शहर आणि कॅम्पसह विद्यापीठ रोड,‎वडाळी, श्रीकृष्ण पेठ, राजकमल चौक,‎साईनगर, गाडगेनगर आदी भागांमध्ये हीच‎ आकडेवारी कायम होती, असे एमपीसीबीचे ‎म्हणणे आहे.

एरव्ही अमरावती शहराचा ‎रोजचा हवा गुणवत्ता निर्देशांक हा १०१ ते २०० ‎या मॉडरेट व्याख्येत मोडणारा असतो. याची ‎मोजदाद सरासरी १२५ ते १३० असते.‎

तज्ज्ञांच्या मते हवेतील धूलिकण आणि‎ वाहनांमधून होणारे कार्बन डायऑक्साइडचे‎ उत्सर्जन यामुळे हवा प्रदूषित होते. परंतु ‎अमरावती शहराच्या काही भागांत असलेल्या ‎हरित पट्ट्यांमुळे ते नियंत्रितही केले जाते.‎त्यामुळे हे शहर ६ ते १० लाख ‎लोकसंख्येच्या महानगरांपैकी शुद्ध हवेचे‎ एक महानगर म्हणून ओळखले जाते.‎दरम्यान दिवाळीच्या दिवशी वाढलेल्या ‎प्रदूषणामुळे मात्र काही वेळासाठी ते ‎वेगळ्या व्याख्येत गेले होते. हवामान ‎केंद्राने केलेल्या मोजणीनुसार अमरावती ‎शहराचा त्या दिवशीचा एक्यूआय हा १२५‎होता. रात्री ८ नंतर मात्र तो बदलला आणि‎ दहाच्या पुढे पुन्हा सामान्य झाला. दरम्यान‎ जिल्ह्यातील इतर तालुक्याचा एक्यूआय सुद्धा‎ ६९ ते १२५ दरम्यान फिरत राहिला.‎

हरित फटाके आणि ‎पावसाचाही फायदा‎

यंदा दिवाळीत काही प्रमाणात‎ झालेला हरित फटाक्यांचा वापर‎आणि ऐन लक्ष्मीपूजनाच्या काही‎वेळ आधी दुपारी आलेला पाऊस‎ यामुळे धूलिकण दबले गेले. याचा‎ परिणाम म्हणूनही दिवाळीत‎ फटाक्यांचे प्रदूषण अधिक प्रमाणात ‎जाणवले नाही. केवळ रात्री ८ ते १० ‎या वेळेत फटाके फोडल्याने‎ प्रदूषणाची पातळी काहीशी वाढून ‎एक्यूआय ३१४ वर पोहाेचला होता.‎

नागरिकांनी अशी घ्यावी ‎दिवाळीमध्ये काळजी‎

वायू प्रदूषणाची पातळी वाढत‎ असताना सार्वजनिक आरोग्याचे ‎धोकेही वाढतात. विशेषत: मुले, वृद्ध‎ आणि श्वसन किंवा हृदय व ‎रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या ‎असलेले व्यक्ती हे सामान्यतः खराब ‎हवेच्या गुणवत्तेमुळे प्रभावित होणारे‎ पहिले गट असतात. जेव्हा‎ एक्यूआय जास्त असतो, तेव्हा‎ लोकांनी खुल्या जागेतील शारीरिक ‎हालचाली कमी कराव्या किंवा‎ पूर्णपणे बाहेर जाण्याचे टाळण्यास ‎प्रोत्साहित करतात.‎ - डॉ. रूपेश काळे, नमूना, ‎अमरावती.‎

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande