सोने चोरीचे प्रकरण : बडनेरा जीआरपीने दाखवला निष्काळजीपणा
अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : बडनेरा रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या एक दिवस आधी रेल्वेच्या जनरल डब्यातून जळगावच्या व्यापारी किशोर शर्मा यांच्याकडून 2.11 कोटी रुपयांचे सोनं चोरीला जाण्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. चौकशीत उघड झाले आहे की, सो
सोने चोरीचे प्रकरण : बडनेरा जीआरपीने दाखवला निष्काळजीपणा


अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : बडनेरा रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या एक दिवस आधी रेल्वेच्या जनरल डब्यातून जळगावच्या व्यापारी किशोर शर्मा यांच्याकडून 2.11 कोटी रुपयांचे सोनं चोरीला जाण्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. चौकशीत उघड झाले आहे की, सोलापूर पोलिसांनी या कुख्यात चोरीच्या टोळीबाबत आधीच विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अलर्ट जारी केला होता, मात्र बडनेरा जीआरपीने त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. परिणामी ही मोठी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर पोलिसांनी गत आठवड्यातच एका टोळीच्या हालचालीबाबत सर्व जिल्ह्यांच्या पोलिसांना माहिती पाठवली होती. शहर गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण यांनीही जीआरपी आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांना टोळीच्या सदस्यांचे फोटो, हालचाली आणि जुन्या गुन्ह्यांची माहिती शेअर केली होती. हे फोटो पोलिसांच्या अनेक व्हॉट्स ऍप ग्रुपवर व्हायरल झाले होते. तरीसुद्धा बडनेरा जीआरपीने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, आणि या निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून व्यापाऱ्याला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले.सध्या बडनेरा जीआरपी चोरांच्या गावापर्यंत पोहोचली आहे, मात्र आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांच्या अनेक पथकांकडून सतत सर्च ऑपरेशन सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चोरांकडे अजूनही चोरी केलेले सोनं आहे, आणि काळ जसजसा पुढे जात आहे, ते पोलिसांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरमधील हीच चोरांची टोळी विदर्भात दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात सक्रिय होते. ही टोळी प्रामुख्याने रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि ज्वेलरी मार्केट परिसरात चोरीच्या घटना घडवते, आणि दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वारदात करून गायब होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande